Friday, October 19, 2018

एकात्मता स्तोत्र १

ॐ नमः सच्चिदानंदरूपाय परमात्मने ।
ज्योतिर्मयस्वरूपाय विश्वमांगल्यमूर्तये ।।१।।

ॐ ज्योतिर्मय, प्रकाशमान स्वरूपात प्रगटणारा, विश्वाचे कल्याण करणारा, सत् चित् आनंद स्वरूपी हे परमात्मा तुला नमस्कार असो.

ॐ हा परब्रह्मवाचक , परमेश्वरी शक्तीचा द्योतक शब्द आहे, ज्यास प्रणवमंत्रही म्हटले जाते. या शब्दास सृष्टीचा आद्य ध्वनी मानले जाते. संपूर्ण अवकाशात अव्यक्तस्वरूपही व्याप्त असणारे हेच शब्दब्रह्म आहे. पुराणे आणि स्मृतिग्रंथानुसार सृष्टीच्या उत्पत्तीसमयी सृजनकर्ता ब्रह्मदेवाच्या मुखातून सर्वप्रथम निघालेला हा शब्द आहे. ॐ हा शब्द अत्यंत मंगल मानला जातो. वेदपारायण किंवा कोणत्याही शुभ कर्माच्या प्रारंभी व समाप्तीच्या प्रसंगीही या प्रणवाचा उच्चार केला जातो. ॐ हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते. अ, उ, म् यांचा मिळून ॐ उच्चार होतो आणि अ म्हणजे ब्रह्मा (सृजनकर्ता), उ म्हणजे विष्णू (पालनकर्ता) व म् म्हणजे महेश - महादेव (संहारकर्ता). सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे प्रतीक म्हणजे ॐ होय. हा शब्द शुभ असल्याने स्वीकृती व संमतीदर्शक अर्थानेही या शब्दाचे उच्चारण करण्याची प्रथा आहे. सच्चिदानंद म्हणजे सत्, चित्, आनंदमय म्हणजे शुद्धज्ञानस्वरूपी शाश्वत आनंदमय ब्रह्म.

भूमिका

भारत म्हणजे काय? देश, हवा, माती, पाणी, आभाळ, झाडं, माणसं... पण एवढं भिन्न खानपान, दिसणं, निसर्ग, भाषा असलेल्या या भूभागात पाश्चिमात्य राष्ट्रवाद ज्यात एक वंश, एक भाषा अश्या गोष्टी अपेक्षित आहेत तो येणार कसा... पण भारतात जी गोष्ट आहे ती म्हणजे एक सांस्कृतिक प्रवाह. असा प्रवाह जो सर्व भिन्नत्वाला सामावून घेत अखंड वाहत आहे.



जेव्हा भारत स्वतंत्र होत होता आणि सरदार पटेल सर्व संस्थानिकांना भेटत होते तेव्हा पहिल्याच सभेत त्यांनी सांगितले की 'भारतीयांपैकी काही जण (ब्रिटिश) प्रांतात तर काही जण संस्थानात राहतात. हा केवळ एक अपघात आहे. आपणा सर्वाची संस्कृती एकच आहे. आपण सर्व जण रक्ताने व हृदयाने एकसंध आहोत. ..तेव्हा आपणाला बंधुत्वाच्या व मित्रत्वाच्या नात्याने एकत्र बसून कायदे बनवायचे आहेत.. मातृभूमीवरील प्रेम व निष्ठेने प्रेरित होऊन आपल्याला एकत्र यावयाचे आहे.. आज आपण इतिहासाच्या निर्णायक ठिकाणी उभे आहोत.. एकत्र न येण्याच्या कारणाने पूर्वी आपण अनेकवेळा परकीयांचे गुलाम झालो होतो.. तेव्हा, बंधूंनो सहकार्य न करून.. ही सुवर्णसंधी वाया घालवून भावी पिढय़ांचा शाप घेऊ नका.' यात सरदारांनी भारतीय ही एक संस्कृती आपल्या सर्वांची आहे हे उद्धृत करून एकत्र येण्याबद्दल सांगितले. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे.

पण या संस्कृती बद्दल, आपल्या पूर्वजांबद्दल, एका राज्यातील माणसाला दुसऱ्या राज्यातील महापुरुषांबद्दल किती माहीत असतं? महाराष्ट्रातील माणसाला लाचित बडफुकन माहीत नसतात, उत्तर भारतातील माणसाला तिरुवल्लूवर माहीत नसतात आणि दाक्षिणात्याला रणजीतसिंह माहीत नसतात. किमान ही नावं आणि त्यांची प्राथमिक माहिती असावी म्हणून संघात आम्ही "एकात्मता स्तोत्र" म्हणतो. शिबिराच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात या स्तोत्राने होते.

या एकात्मता स्तोत्रातील सगळ्या बाबींची थोडक्यात माहिती लातूर येथील प्राध्यापक डॉ रमेश जोशी यांनी एका छोट्या पुस्तिकेत दिली आहे. ती माहिती त्यांच्या पूर्वपरवानगीने या ब्लॉग वर देत आहे.

अमृतसर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् । इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।। शीख पंथियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेले हे पंजा...